Friday, September 4, 2009

जमिनीचे / भूमीचे परीक्षण - 02

४. भूमीच्या मध्यात एक हाथ (दीड फुट) लांब रुंद व उंच असा खड्डा खोदावा. खड्डा खोदल्यावर त्यातून निघालेली माती पुन्हा त्याच खड्ड्यात भरावी. जर तो खड्डा पूर्ण भरला व तरी देखील माती शिल्लक राहिली तर अशी जमीन उत्तम समजली जाते. तसेच माती शिल्लक राहिली नाही म्हणजे ती माती बरोबर भरली तर ती जमीन मध्यम समजली जाते. आणि जर माती पूर्ण टाकल्या नंतरही तो खड्डा भरला नाही तर अशी जमीन कनिष्ठ समजली जाते. (संदर्भ समरांगण सूत्रधार अ. ८).
 
५. भूमीच्या मध्यात एक हाथ (दीड फुट) लांब रुंद व उंच असा खड्डा खोदावा व तो पूर्ण पाण्याने भरावा व १०० पावले चालत जावे आणि परत त्या ठिकाणी यावे. आल्यानंतर त्या खड्ड्यात बगावे जर पाणी तेवढेच राहिले तर अशी भूमी सर्व कार्यास शुभ समजली जाते. जर पाणी थोडे कमी झाले म्हणजे जर पाण्याची पातळी अर्ध्या खड्ड्याच्या पर्यंत अथवा थोडी वर राहिली तर अशी भूमी मध्यम समजली जाते. जर पाण्याची पातळी अर्ध्या खड्ड्याच्या खाली गेली तर अशी भूमी कनिष्ठ समजली जाते. (संदर्भ समरांगण सूत्रधार अ. ८).
 
तसेच ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र वर्णानुसार अनुक्रमे श्वेत (पांढरा), लाल, पिवळा व काळा अश्या कलरच्या फुलांच्या माळा त्या खड्ड्यात ठेवाव्यात. म्हणजेच श्वेत रंग ब्राह्मणास, लाल रंग क्षत्रियास, पिवळा रंग वैश्यास व काळा रंग शूद्रास अशाप्रमाणे  ज्या रंगाची माळ सर्वात लवकर सुकणार नाही (म्हणजे सर्वात शेवटी सुकेल). त्या रंगाच्या वार्णासाठी ती भूमी शुभ समजली जाते. (संदर्भ समरांगण सूत्रधार अ. ८). 
 
६. वर सांगीतल्या प्रमाणे एक खड्डा काढून सायंकाळी तो खड्डा पूर्ण पाण्याने भरावा व सकाळी येवून तो खड्डा परत बघावा जर त्या खड्ड्यात पाणी शिल्लक दिसले तर अशी भूमी निवास करण्यास शुभ समजली जाते. जर त्या खड्ड्यात चिखल दिसला तर अशी जमीन मध्यम समजली जाते. जर त्या खड्ड्यात भूमीला भेगा पडलेल्या दिसल्या तर अशी भूमी निवास करण्यास वर्ज्य समजली जाते तेथे निवास करू नये. 
 
७. भविष्यपुराण मध्ये आलेल्या संदर्भानुसार पाण्याच्या वर अथवा मंदिरावर राहण्यासाठी घर बनवू नये.
 
८. ब्राम्हण वर्णासाठी श्वेत रंगाची, क्षत्रिय वर्णासाठी लाल रंगाची, वैश्य वर्णासाठी पिवळ्या रंगाची व शुद्र वर्णासाठी काळ्या रंगाची जमीन शुभ समजली जाते.
 
९. ब्राम्हण वर्णासाठी गोड वासाची, क्षत्रिय वर्णासाठी रक्ताच्या वासासारखी, वैश्य वर्णासाठी अन्नाच्या वासासारखी व शुद्र वर्णासाठी मद्याच्या वासासारखी भूमी शुभ समजली जाते.
 
१०. ब्राम्हण वर्णासाठी गोड व तुरट स्वादाची, क्षत्रिय वर्णासाठी तिखट स्वादाची, वैश्य वर्णासाठी आंबट स्वादाची व शुद्र वर्णासाठी कडवट स्वादाची भूमी शुभ समजली जाते.

1 comment: